Wednesday, February 5, 2014

" गायतोंडे " पाने वाढली पण किंमत नाही … 



 फायनली " गायतोंडे " ग्रंथ आता तयार झाला आहे .
छपाईच्या प्राथमिक बाबी पूर्ण होताच त्याची छपाई सुरु होईल .
हा ग्रंथ २०० पानांचाच असेल असे आम्ही आधी जाहीर केलं होतं .
पण आता पानं वाढली आहेत .
या ग्रंथाचं काम पूर्णत्वाला जात असताना असं लक्षात आलं की
यात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी याचं लिखाण नाही ,
आणि ही काही बरी गोष्ट नव्हे ,
गायतोंडे आणि नाडकर्णी यांच्यात मैत्री तर होतीच ,
पण गायतोंडे यांच्यावरचा एकमेव मोनोग्राम नाडकर्णी यांनीच
लिहिला आहे . इतकंच नाही तर गायतोंडे यांच्यावर सर्वात
जास्त लिखाण नाडकर्णी यांनीच केलं आहे .


पण आता नाडकर्णी तर नाहीत ,
अनेकवार प्रयत्न करूनही त्यांच्या पत्नी शालिनी नाडकर्णी यांच्याशी
संपर्क साधता आला  नाही .
मग आम्ही निर्णय घेतला की आपल्याच संग्रहातला एखादा लेख
पुनर्मुद्रित करावयाचा .
पण त्याचं   त्यातलं बहुसंख्य लेखन हे वृत्तपत्रात प्रसंगपरत्वे प्रसिद्ध
झालं असल्यानं त्याला टिकावूपणा नव्हता , मग आम्ही निर्णय
घेतला की त्यांच्या 'अश्वथाची सळसळ ' या पुस्तकातला लेखच
पुनर्मुद्रित करावयाचा .


प्रकाशक रामदास भटकळ यांना मेल केली , त्यांनी ही लागलीच
परवानगी दिली आणि नाडकर्णी यांचा लेख " गायतोंडे "ग्रंथात समाविष्ट झाला .
नाडकर्णी यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ स्नेहामुळे हे घडले असे नाही तर
ती त्या ग्रंथाची गरज होती म्हणून ते घडले .
 फिरोज रानडे यांचा लेखही असाच ग्रंथाची गरज म्हणून  समाविष्ट झाला .


साहजिकच पानात वाढ झालीच ,  त्यातच ग्रंथाची मांडणी किवा रचना
करताना निवडकच प्रकाशचित्र प्रकाशित करावयाची असे बंधन घालून
घेतल्याने ,( नाहीतर ग्रंथाला मासिकाचे स्वरूप आले असते , किवा कदाचित
स्मरणिकेचे सुद्धा ,) मोठ्या प्रमाणावर प्रकाशचित्रे उरली ,
मोठ्या कष्टाने जमवलेली अतिशय दुर्मिळ अशी ही प्रकाशचित्रे अशी
निकालात काढायची कल्पना मनाला बरी वाटेना ,


त्यातून त्यांचा एक आल्बम सर्वात शेवटी द्यावयाची कल्पना सुचली ,
पुन्हा पाने वाढली , मग म्हटलं आता एवीतेवी पाने वाढतातच आहेत
तर गायतोंडे यांच्या या ग्रंथासाठी जमवलेल्या सर्वच्या सर्व पेंटिग्जच्या
थंबनेल्स का वापरू नयेत ?त्या अभ्यासकांना . कलारसिकांना नक्कीच उपयोगी
ठरतील . झालं . असं करता करता २४ पानं कशी वाढली ते कळलंच नाही .
अर्थातच ग्रंथाचा निर्मिती खर्चही वाढलाच , पण त्याची पर्वा कोण करतो ?
' (चिन्ह 'ची प्रकाशनं का वाट पहावयास लावतात हे या 
उदाहरणावरून स्पष्ट व्हावयास हरकत नाही . )


तर सरते शेवटी आता हा ग्रंथ तब्बल २२४ पानांचा झालाय .
त्यातली निम्मी पाने आम्ही चित्र आणि प्रकाशचित्रांना दिली आहेत .
त्यात  आम्ही गायतोंडे यांची तब्बल ६५  पेंटिग्ज  प्रसिद्ध केली आहेत ,
तर गायतोंडे यांचे अत्यंत  दुर्मिळ असे ४८  फोटो  ४८ पानांमध्ये प्रसिद्ध केले आहेत .
याशिवाय आल्बम मध्ये प्रसिद्ध होणारी पेंटिग्ज आणि फोटो वेगळेच .
आता सांगा अशा प्रकारचं पुस्तक किवा ग्रंथ मराठीत या पूर्वी प्रकाशित
झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का ?
एवढं करून आम्ही आधी जाहीर केलेल्या किमतीतच हे सारे देतो आहोत
असं तुम्ही कधी पाहिलं आहे का ?
पण हो १५ फेब्रुवरी नंतर मात्र आम्ही या ग्रंथाची किमत वाढवतो आहे हे निश्चित , १५ फेब नंतर या ग्रंथाची किमत किमान रु २५०० इतकी नक्कीच होईल .
तेव्हा आता अधिक वाट पाहू नका , वेळ दवडू नका .
उचला फोन , पाठवा संदेश   NKG किंवा  NK3 चिन्हच्या ९००४०३४९०३या नंबरावर ….


सतीश नाईक
संपादक चिन्ह